
प्रा. नम्रता भट
लेखिका /संपादिका /प्रकाशिका
प्रा. नम्रता भट ह्या एक संशोधक, संपादक आणि प्रकाशिका आहेत. संपूर्ण हिंदुस्थानातील साधू संतांची चरित्रे लिहिण्याची स्वामींची त्यांना आज्ञा झाली. प्रारंभी त्या हे कार्य आपली कॉलेज मधील लेक्चररशिप सांभाळून करीत होत्या. सतत भ्रमंती, वाचन, लेखन, छायाचित्रण, संदर्भ ग्रंथ आणि प्रापंचिक जबाबदाऱ्या हि तारेवरची कसरत सुरु होती. पण पुढे या दोन्ही गोष्टी एकाचवेळी करणे आणि त्यांना न्याय देणे जमेनासे झाले म्हणून स्वामींच्याच आज्ञेने नोकरी सोडून त्यांनी पूर्णवेळ ह्या संशोधन कार्यालाच वाहून घेतले. अर्थातच ह्या कार्याला वाचकांचा आणि स्वामी भक्तांचा उदंड प्रतिसाद लाभत गेला आणि उत्तरोत्तर रात्रंदिवस हे कार्य सुरु झाले ते अगदी आज अखेर सुरूच आहे. प्रा. नम्रता भट ह्या आकाशवाणी रत्नागिरी आणि मुंबई केंद्रावर सेवारत होत्या. दैनिक सागर, रत्नागिरी टाइम्स, स्त्री, स्वराज्य, लोकसत्ता अश्या अनेक नियत कालिकातून गेली ४४ वर्षे त्यां अव्याहतपणे लेखन करित आहेत. त्यानंतर त्यांनी स्वतःचा प्रकाशन व्यवसाय सुरु केला.
प्रथम त्रिदल आणि रजिस्ट्रेशन मिळाल्या नांतर शब्द त्रिदल ह्या नावाने १९८४ पासून त्यांनी विविध विषयांवर संपूर्ण संशोधन करून, प्रतिवर्षी नावीन्यपूर्ण विशेषांक प्रकाशित केले. उदा. संपूर्ण भारतातील तीर्थक्षेत्रे, देव आहे किंवा नाही, संपूर्ण भारतातले किल्ले, कुसुमाग्रज काव्य विशेषांक, चौदा विद्या चौसष्ठ कलांवरील विशेषांक इत्यादी वैविध्य पूर्ण वार्षिक विशेषांक प्रसिद्ध केले ज्याचे संपूर्ण महाराष्ट्रात उत्तम स्वागत झाले. प्रा. नम्रता भट ह्यांनी आजवर, संपूर्ण हिंदुस्थानातील सुमारे बाराशे संतांची चरित्रे लिहून साडेतीन हजार पृष्ठांचे, चौदा किलो वजनाचे “सकल संत चरित्र गाथेचे” ७ खंड प्रसिद्ध केले आहेत. हे कार्य कुठल्याही जात, पंथ, धर्म, संप्रदाय अथवा प्रादेशिक सीमांनी मर्यादित नसून, पूर्णपणे संशॊधनपर आहे. केवळ साधू संतच नव्हे तर संसारात राहून कार्य करणाऱ्या अनेक सज्जन व साध्वीची चरित्रे तसेच समाज कार्यकर्त्यांना प्रकाशात आणण्याचे काम स्वप्नील प्रकाशन तर्फे त्या करीत आहेत.
त्यांची लेखन शैली अत्यंत सुगम असून सामान्य वाचाकलाही रुचेल आणि पचेल अशी आहे. त्यांनी ह्या पूर्वी ललित लेखन व काव्य निर्मितीहि केली आहे. स्वामी समर्थांच्या जीवन चरित्राचा आढावा घेणारा “स्वामी समर्थ गीत गाथा” तसेच “ओवी ते अंगाई” नामक प्रबोधनपर सांगीतिक कार्यक्रमही त्या सादर करतात. पत्रकारिता, वक्तृत्व, लेखन, संशोधन, भ्रमंती आणि प्रकाशन असे सर्व गुण एकाच व्यक्तीच्या ठायी सापडणे तसे दुर्मिळच. त्यांच्या ह्या गुणसंपदेमुळेच स्वामी समर्थ महाराजांनी त्यांना ह्या कार्यासाठी नियुक्त केले. या त्यांच्या कार्याची दखल पु ल देशपांडे, कुसुमाग्रज, सेतू माधवराव पगडी इत्यादी मान्यवरांनी घेतली आहे. महाराष्ट्राच्या साहित्यात व अध्यात्मिक ग्रंथसंपदेत श्रीमती नम्रता भट यांनी मोलाची भर घातलेली आहे.
स्वामी समर्थांच्याच प्रेरणेने व मार्गदर्शनाने केवळ त्यांचेच समग्र जीवन चरित्र, त्यांचे शिष्य, प्रशिष्य, शेकडो मठ, असंख्य कृपांकित घराणी आणि त्यांची अक्कलकोटला येण्या पूर्वीची सडे सहाशे वर्षांची क्षेत्र भ्रमंती ह्याचा पाठ पुरावा प्रा. नम्रता भट यांनी २००७ पासून सुरु केला. त्या संशोधन प्रकल्पातील “स्वामी समर्थ गौरव गाथा” नामक सुमारे २००० पृष्ठांचे, ४ बृहद खंड, २०१४ अखेर लिहून त्यांनी प्रकाशित केले. ह्याच विषयावर त्यांचे अधिक ससंशोधन सुरु असून उर्वरित माहितीचा आढावा घेणाऱ्या एक संक्षिप्त ग्रंथाचे लिखाण सध्या सुरू आहे.
गेली ३३ वर्षे त्यांचे हे कार्य अहोरात्र अव्याहत पणे सुरू आहे. त्या प्रित्यर्थ अनेक पुरस्कार आणि मान सन्मान त्यांना प्राप्त झाले आहेत. त्यांच्या या अफाट कार्याची दखल श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान अक्कलकोट ने घेतली. दि.२४ मे, २०१६ रोजी “स्वामी चरण प्रसाद” नामक सर्वोच्च पुरस्कार वटवृक्ष देवस्थान अक्कलकोट येथे, शेकडो स्वामी भक्तांच्या उपस्थितीत, त्यांना समारंभपूर्वक बहाल करण्यात आला.

श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट.. चरीत्र-कार्य-उपदेश
(११४९ ते १८७८ छेलीखेडा- कर्दळीवन ते अकलकोट अभूतपूर्व जीवन यात्रा)
श्री स्वामी समर्थ महाराज, अक्कलकोटचे परब्रह्म, त्यांच्या देह निर्वाणाला दीडशे वर्षे उलटून गेली, तरी लोकोध्दाराचे त्यांचे कार्य अखंडपणे सुरूच आहे. “हम गया नहीं, जिंदा है”, याची साक्ष पटवीत करोडो भक्तांच्या पाठीशी ते पहाडासारखे उभे आहेत. असे असले तरी भक्तांच्या मनात त्यांच्या विषयी अनेक प्रश्न व संभ्रम आहेत. स्वामी नेमके कोण होते, त्यांना अनंत कोटी ब्रह्मांड नायक का म्हणतात. त्यांचे प्रगटीकरण कुठे व कधी झाले? अक्कलकोटमध्ये ते कधी आले? तत्पूर्वी सातशे वर्षे अखिल भारतवर्षात ते कुठे कुठे हिंडले? ह्या संचार यात्रेचे प्रयोजन काय होते ? जुन्या नव्या गद्य पद्यचरित्रांमधून ज्या भक्त, शिष्य सेवेकऱ्यांचे उल्लेख येतात त्यांचे कार्य काय? स्वार्मीच्या संपर्कात ते कधी व कुठे आले? मुंबईतील पंचवीस वर्षांच्या वास्तव्यात तसेच आपल्या जीवित काळात हजारो मैलांची पदयात्रा करीत, क्षेत्रो क्षेत्री त्यांनी धर्म संस्थापना कशी केली? परकीय सत्तांशी त्यांनी कसा लढा दिला? त्यांची शिकवण व अवतार महात्म्य काय? त्यांची उपासना कशी करावी? असे अनेक प्रश्न, लाखो स्वामी भक्तांच्या मनात आजही घर करून आहेत, ज्याची समाधानकारक उत्तरे आजवर मिळालेली नाहीत.
पारंपारीक कलाप्रकारांक लागून लोकांक संस्कृतायेचीं मुळां जाणवतात.
नेमके हेच प्रश्न मलाही पडले आणि माझी शोध मोहीम सुरू झाली. गेली तीन दशके स्वामींच्या आशेने डोळसपणे, जुनी नवी चरित्रे वाचून मी आसेतू हिमाचल भ्रमंती सुरु केली. धर्मग्लानीच्या काळात या कलियुगात, हरियाणात छेलीखेडा येथे चैत्र शुध्द द्वितीया, सन ११४९ ला हा अजन्मा जन्मा आला. हिंदुस्थानच्या मानगुटीवर बसलेली धर्मांध मुस्लिम राजवट उलथवून टाकण्यासाठी, ठीकठिकाणी चाललेला अन्याय अत्याचार रोखण्यासाठी, हादरलेल्या हिंन्दुस्थानी जन मानसात, दास्य गुलामगिरी झुगारून, श्रध्दाभक्तीची ज्योत फुलवण्यासाठी, भगवंताला स्वार्मीच्या रूपात अवतार घेणे भाग पडले. “प्रथम आम्ही कर्दळीवनातून निघालो” असे म्हणत त्यांनी कलकत्ता बंगाल प्रांत पिंजून काढला. हिंन्दुस्थानातील काशीपासून रामेश्वर पर्यंत व कर्नाटक, सौराष्ट्र, राजस्थान, ओरिसा, हिमालय परिसरात अखंड परिभ्रमण केले. तत्कालीन राजेरजवाडे, संस्थानिक, धर्म मार्तंड यांची कानउघडणी करून त्यांना स्वधर्माचरणास प्रवृत्त केले. अमानवी वाटावी अशी उंचनिंच दीर्घबाहू टोलेजंग देहयष्टी आणि प्रदीर्घ निरामय आयुर्मान ह्या बळावर, हा कृतीशील कर्मयोगी, विरक्त संन्यासी, द्रष्टा समाज सुधारक, हिन्दू धर्म व संस्कृतीच्या रक्षणासाठी प्रथम सुलतानी व नंतर विषारी ब्रिटिश सत्तेशी झुंज देत एकांड्या शिलेदाराप्रमाणे, एकाच वेळी अनेक आघाड्यांवर लढत राहिला.
ह्या पृथ्वीतलावर “मीच राम होतो, मीच कृष्ण होतो” याची ग्वाही देत सात शतके अक्षरशः तळपत राहिला. आयुष्याच्या अखेरच्या पर्वात महाराष्ट्रात दाखल झाला. बुवा, दिगंबर, वेडा, पिशाच्च, जादूगार, चंचलभारती, कुलगुरु, वृध्द नृसिंह सरस्वती, अशा अनेक नावांनी ओळखला जाणारा हा चालता बोलता परमेश्वर, अक्कलकोटच्या अखेरच्या बावीस वर्षांच्या वास्तव्यात स्वामी समर्थ नावाने विख्यात ठरला..। सन ११४९ च्या अवतरणापासून, सन १८०० च्या दरम्यान महाराष्ट्रात येई पर्यंतची, साडेसहाशे वर्षांची त्यांची घणाघाती तेजस्वी जीवनयात्रा, तपशीलवारपणे, क्रमशः आजवर जगासमोर आलीच नाही. अन्यथा रामायण महाभारता सारखा महाग्रंथ सिध्द झाला असता. त्यांच्या आज्ञेने हे कार्य मी स्वीकारले. महाराजांच्या समग्र जीवन यात्रेचा शोध आणि वेध घेण्याचा; सातशे एकोणतीस वर्षांचा त्यांचा चरित्रपट, संपूर्ण जीवनवृत्तांत संक्षिप्तपणे परंतु साकल्याने उलगडण्याचा प्रयत्न ह्या ग्रंथाच्या माध्यमातून मी केला आहे. स्वार्मीसारख्या तेजोनिधीच्या महाकार्याचा इतिहास, एका ग्रंथाच्या चौकटीत बसवणे हे केवळ अशक्य. परंतु अनेक वर्षांच्या परिश्रमानंतर स्वार्मीच्या कृपेने, ते अंशतः तरी शक्य झाले. माझ्या अल्पमतिनुसार, अनेक चरित्रे व संदर्भग्रंथांचा अभ्यास करून काशी पासून रामेश्वरपर्यंत भ्रमंती करून, दुर्मिळ छायाचित्रे, दस्ताऐवज, विद्यमान वंशजांचा शोध, अशा अनेक प्रकारे प्रयत्नांची शर्थ करून, हे लीलावैभव साकार केले आहे. ‘स्वामी समर्थ गौरव गाथा’ या नावाचे चार मोठे ग्रंथ मी या पूर्वीच प्रसिध्द केले असून त्यातील महत्वाचा मजकूर आणि गेल्या आठ-दहा वर्षात झालेले नवीन संशोधन, ह्यातून हा नवा कोरा ग्रंथराज सिध्द झाला आहे. ह्या नंदादीपाच्या प्रकाशात आपणा सर्वांचे जीवन सर्वस्वी उजळून निघो, अशी प्रार्थना करीत इथेच थांबते.
अस्तु । शुभं भवतू !!
लेखिका-संपादिका-प्रकाशिका
प्रा. नम्रता भट, मुंबई.
केवळ व्हॉट्सॲप संपर्क
+91 8356817900
हा ग्रंथ बाजारात वेबसाइट अथवा ऑनलाइन कुठेही विक्रीस उपलब्ध नसून केवळ कुरियर ने घरपोच मिळवण्याकरीता वरील नंबर वर आम्हाला व्हाटसप्प मेसेज करावा कृपया फोन किंवा व्हाटसप्प कॉल लावू नये ही नम्र विनंती. आपल्याला 24 तासांत आम्ही संपर्क करून पुढील माहिती देऊ. हे स्वामी कार्य मी स्वप्नील भट , प्रा. नम्रता भट यांचा मुलगा आपली नोकरी व्यवसाय सांभाळून अर्थात स्वामी कृपेने एकट्याने करत असल्यामुळे उत्तर मिळण्यास उशीर होऊ शकतो त्यामुळे निराश होऊ नये. 👍
🙏श्री स्वामी समर्थ 🙏
ताजा कलम
🙏सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार🙏
मी यापूर्वी लिहिलेले श्री स्वामी समर्थ गौरव गाथा ग्रंथ आता उपलब्ध नाहीत. त्याच्या सर्व प्रती संपल्या आहेत. परंतु माझे स्वामी समर्थ महाराजांवरील संक्षिप्त ग्रंथाचे लिखाण सद्ध्या तयार झाले आहे. मधल्या काळात मी आजारी होते. स्वामी कृपेने प्रकृती आता स्थिर आहे. परंतु दोन्ही डोळ्यांची तक्रार आल्याने प्रूफ तपासणे, डीटीपी इत्यादि कामामुळे ह्या वेळी ग्रंथ प्रकाशनास थोडा विलंब झाला. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने हे कार्य स्वामी पूर्ण करून घेतील अशी मला आशा आहे.
यापूर्वी प्रकाशित झालेली कोणतीही पुस्तके आता वितरणात नाहीत याची मायबाप वाचकांनी कृपया नोंद घ्यावी. ती सर्व पुस्तके पुनः प्रकाशित करणे आर्थिक आणि मनुष्यबळाअभावी अशक्य आहे. परंतु स्वामींची पूर्वी संपादित केलेली तसेच काही नवी गवसलेली माहिती या संक्षिप्त ग्रंथाद्वारे जास्तीत जास्त स्वामी भक्ता पर्यन्त आणि वाचकांपर्यंत पोहोचविण्याचे मी ठरवले आहे. ह्या कार्यात आजवर सर्व स्वामी भक्त, सेवेकरी आणि साधकानि हस्ते-परस्ते, आर्थिक, सामाजिक, आध्यात्मिक व राजकीय पातळीवर मला सहाय्य केले त्या साठी मी आपली ऋणी आहे. सुमारे 692 अधिक पानांचा हा ग्रंथ आहे. आपण सर्वानी ह्या पुस्तकाच्या प्रती खाली दिलेला ही पुस्तके केवळ पुस्तक विक्रेते किंवा दुकानांमध्ये न ठेवता थेट आप्ल्या घरी कुरियर ने पाठवली जातील. यामुळे पुस्तक वितारणाचे ख़र्च कमी होऊन वाचकांना मात्र रु.११००/- मिळणार असून प्रति मागे २ किलो वजन असल्याने कुरियर ख़र्च महाराष्ट्रात रु.200 आणि महाराष्ट्राबाहेर रु.400.
आकारला जाईल!
ऑर्डर देण्या संबंधी आपण 8356817900 या Whatsapp नंबर वर केवळ मेसेज द्वारे सम्पर्क साधा. कृपया फोन करू नये ही विनंती. आपल्याला त्यावर रिस्पॉन्स मिळेल सर्व प्रती लौकर संपून जाण्याची शक्यता असल्याने आपल्याला एकाहून अधिक प्रती हव्या असल्यास अथवा आपल्या कुणी नातेवाईक, मित्र मंडळींनि ते घ्यावे अशी इच्छा आपण सर्वाना हा फॉर्म भरण्यास पाठवा. हे पुस्तक श्री स्वामी कृपेने 5 सप्टेंबर 2024 रोजी पुणे येथे प्रकाशित झाले हे आम्ही सर्वाना कळवत आहोत.
🙏🏻प्रा. नम्रता भट🙏
www.swapnilprakashan.com